Terna Dam Makni : बेलकुंड उपसा सिंचन योजना : शेतकरी संघर्षाची नांदी?

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

(लोहारा) : Terna Dam Makni : औसा तालुक्यातील बेलकुंड उपसा सिंचन योजना सध्या मोठ्या वादळाला तोंड देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. धरण परिसरातील शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की – “आम्ही एक इंचही जमीन देणार नाही!”

माकणी प्रकल्पाची पार्श्वभूमी

  • धरणाचे नाव: माकणी धरण
  • निर्मिती वर्ष: 1989
  • मूळ क्षमता: 121 दशलक्ष घनमीटर (सुमारे ४ टीएमसी)
  • सध्याची क्षमता: 85 दशलक्ष घनमीटर (गाळामुळे)
  • विद्यमान प्रकल्प: अशिव उपसा सिंचन योजना, निम्न तेरणा प्रकल्पाचा डावा व उजवा कालवा निलंगा,उमरगा पाणीपुरवठा योजना इत्यादी साठी पाणी राखीव

धरणातील पाण्यावर आधीच अनेक प्रकल्प सुरू असल्याने नव्या योजनेसाठी पाणी कुठून आणणार हा मोठा प्रश्न आहे.

नवीन बेलकुंड योजनेवरील प्रश्नचिन्

22 ऑगस्ट रोजी जलसंपदा विभागाने तब्बल 190 कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता दिली. परंतु तज्ज्ञांचे मत आहे की यासाठी धरणाची उंची वाढवावी लागेल.

शेतकऱ्यांची भीती

  • आधीच ५०% हून अधिक जमीन धरणामुळे बुडाली आहे.
  • उंची वाढवली तर पुन्हा शेतजमीन जाणार.
  • हजारो शेतकरी भूमिहीन होण्याची भीती.

शेतकरी नेत्यांचा इशारा

सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेते अनिल जगताप यांनी स्पष्टपणे सांगितले –

Terna Dam Makni

“जर आमच्या जमिनी पुन्हा घेतल्या तर शेतकरी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं करतील. माकणी धरणाचे पाणी पेटणार हे आता निश्चित!”

बेलकुंड योजनेची थोडक्यात माहिती

बाबतपशील
योजना नावबेलकुंड उपसा सिंचन योजना
खर्च190 कोटी रुपये
प्रभावित गावे10–15
पाण्याखाली जाणारी जमीनअंदाजे 7000 एकर
धरणाचे स्थानमाकणी, धाराशिव
धरण निर्मिती1989
मूळ क्षमता121 द.घ.मी.
सध्याची क्षमता85 द.घ.मी.

शेतकरी संघर्ष पेटणार

बेलकुंड उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी पाणीपुरवठ्याचा नवा स्रोत ठरेल, असा शासनाचा दावा आहे. पण प्रत्यक्षात हजारो शेतकरी पुन्हा जमीन गमावण्याच्या भीतीत आहेत. त्यामुळे हा वाद शांततेने सुटेल की मोठा शेतकरी संघर्ष पेटणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.