धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असणाऱ्या,अल्पावधीतच आपल्या खास मार्केटींच्या जोरावर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या Hotel Bhagyashri च्या मालकालकाचे काही अज्ञात इसमांनी अपहरण करून जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Hotel Bhagyashri Owner Attack: संपूर्ण घटनेचा घटना क्रम खालील प्रमाणे:
Hotel Bhagyashri चे मालक गाडी थाबवून उभे राहिले असता काही अज्ञात इसम त्यांच्या जवळ येवून एक फोटो हवा आहे असे म्हणून गाडीच्या जवळ आले आणि हॉटेल मालकाल गाडीतून खाली खेचून आपल्या गाडीत बसवले.गाडीत हॉटेल मालकाल डामल्यानंतर त्याना बेदम मारहाण चालू करण्यात आली.प्राथनिक माहितीनुसार एकूण 4 हल्लेखोर असल्याची माहिती समोर येत आहे.
Hotel Bhagyashri Owner Attack: कोठे घडला प्रकार?
हॉटेल भाग्यश्री पासून 5 कि.मी अंतरावर असलेल्या सिद्धेशोर वडगाव परिसरात हा सर्व प्रकार घडल्याची प्राथनिक माहिती समोर येत आहे. सिद्धेशोर वडगाव गावाजवळ असलेल्या उड्डाण पुलावर हॉटेल मालकाल बेदम मारहाण करून सोडून देण्यात आले.

स्थानिकांची प्रतिक्रिया:
या सर्व प्रकरणामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भितीची परिस्थिती निर्माण झालेली आहे.व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसानी या परिसरात गस्त वाढवावी आणि व्यापाऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.