धाराशिव : Kharif Crop Insurance 2025 :खरीप पिक विमा 2025
तांत्रिक उत्पादनाच्या अटीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान. अट शिथिल करा पिक विमा अभ्यासक अनिल जगताप..


कापणी प्रयोगातून 50% व तांत्रिक उत्पादनावर आधारित 50 टक्के नुकसान भरपाई देण्याची पिक विमा योजनेतील अट हे शेतकऱ्यांना जाचक ठरत असून त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याला 1068 कोटी रुपये मिळण्याऐवजी चक्क 366 कोटीवर समाधान मानावे लागत आहे. गेल्या वर्षीपासून लागू केलेल्या नव्या पिक विमा योजनेमुळे पेरणी पासून काढणीपर्यंत केवळ पीक कापणी प्रयोगा आधारित नुकसान भरपाई दिली जात आहे.



गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख 66 हजार शेतकऱ्यांनी एकूण चार लाख 96 हजार अर्जाद्वारे पिक विमा भरला होता जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस होऊन नुकसान भरपाई होऊ नये सॅटॅलाइट इमेज ने जे तांत्रिक उत्पादन दाखवले त्यात अंदाधुंदी असून एका महसूल मंडळाला 24000 मदत मिळते तर त्याच्या शेजारी असणाऱ्याच महसूल मंडळाला केवळ आठ हजार पाचशेवर समाधान मानावे लागते हा धडधडीत पुरावा आहे ही अट शिथिल करून पूर्वीप्रमाणे चारही ट्रिगर लागू करावी अशी मागणी पिक विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी केली आहे.



याजाचक अटीमुळे धाराशिव जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळांना पिक विमा नुकसान भरपाई पासून वगळले असून त्याविरुद्ध राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे याचिका तर दाखल केलीच आहे मात्र 30 जुलै रोजी लोहारा तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार आहोत
शेतकऱ्यांना न्याय मिळापर्यंत लढावं संघर्ष चालूच राहील.

अनिल जगताप पिक विमा अभ्यासक




